गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

गणपती गेले गावाला.....

आज आमच्या घरचे गौरी गणपतींच विसर्जन झाल. पाच सहा दिवस घरात किती मस्त वाटत. सकाळी आरती, नैवद्य, मोदक, हार फुले, तो धूप -अगरबत्ती -कापुराचा सुवास, सजावटीची रोषणाई, सगळ कस मंगलमयी वातावरण होऊन जात. इतके दिवस केलेली धमाल मस्ती सगळ डोळ्यासमोरून जात विसर्जनाच्या दिवशी .
आत्ता जेंव्हा विसर्जन करून आलो तेंव्हा पहिली नजर पडली ती गणपती बसवलेल्या जागी, तो सजवलेला मकर तसाच ती रोषणाई तशीच पण, पण बाप्पाच नाही तर मकर एकदम सून सून वाटत आणि खूप वाईट वाटत. मग लहान मुल म्हणतात न तस एकदा मनात म्हणून घेतो "गणपती गेले गावाला चैन पडे न आम्हाला "...."गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या". खरच बाप्पा लवकर या. आणि तुमची कृपादृष्टी नेहमी आमच्या वर असू द्या.

मोरया रे बाप्पा मोरया रे.......

२ टिप्पण्या:

BinaryBandya™ म्हणाले...

बाप्पा विना मकर भकास भकास वाटते ... :(

Sachin म्हणाले...

ekdam sundar aahe...!!