शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

आजही घडतंय महाभारत आणि वस्त्रहरण

माझ्या महा'न' भारतात पुन्हा पुन्हा महाभारत घडतंय. १०० आणि त्याहून अधिक वाईट वृत्ती आणि प्रवृत्ती बरोबर लढणारे ५ आणि त्याहीपेक्षा कमी प्रमाण झालेले चांगल्या वृत्ती आणि प्रवृत्ती. खरच दयनीय झालो आहोत आम्ही. आज मला अखंड भारत वर्ष त्या मयसभेतल्या बघ्यानसारखा भासतोय ज्या मयसभेत द्रोपदीच वस्त्र हरण झाल होत. युगानुयुगे उलटून गेली तरी तेंव्हाही 'स्त्री' असुरक्षित होती आणि ती आजही असुरक्षितच आहे. त्यावेळी कौरव १०० होते आज प्रत्येक गल्ली बोळात १०० विकृतींचे कौरव आहेत. पांडव तेंव्हाही निष्क्रिय होते आणि आजही आमच्यातल्या चांगल्या प्रवृत्तीची माणस निष्क्रिय भासत आहेत. धृतराष्ट्रा सारख आंधळ सरकार, गांधारी सारख डोळस पण डोळ्याला पट्टी बांधलेली न्याय व्यवस्था, मयसभेत घडत असलेल सगळ थांबवता येईल इतकी ताकद असलेले पण आंधळ्या सरकारच्या मर्जीत असलेले भीष्म पितामह म्हणजे आजची प्रशासन व्यवस्था. आजच्या प्रत्येक स्त्रीला म्हणजेच ह्या महा'न' भारतातल्या आजच्या द्रोपदीला आजही तेच भोगाव लागतंय, आजही तीच शोषण होतंय, आजही तिला ह्या मयसभेत नागव करायला शंभराहून अधिक हात आसुसलेत. त्या द्रोपदीला वस्त्र हरणापासून वाचवणारा कृष्ण मात्र आजच्या द्रोपदीला कुठे दिसत नाहीये..शून्यात नजर लावून बसलेली आजची द्रोपदी खरच एका कृष्णाची वाट पाहत आहे. कृष्णा ने चांगल परिवर्तन घडवून आणल आज गरज आहे परिवर्तनातून कृष्ण निर्माण करण्याची. --प्रशांत ठाकूर